बुटीबोरी तहसील होणार का? नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली

बुटीबोरी : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी हे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनिक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सध्या बुटीबोरीमध्ये तहसील कार्यालय नसल्यामुळे नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी अन्य ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बुटीबोरी शहराला तहसील दर्जा मिळावा आणि ॲडिशनल तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

लोकसंख्येचा विचार करून प्रशासनाने निर्णय घ्यावा

बुटीबोरी शहर आणि परिसरातील ग्रामीण भाग मिळून दोन ते अडीच लाख लोकसंख्या आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासकीय सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सरकारी योजनांचे लाभ, उत्पन्न दाखले, रहिवासी प्रमाणपत्रे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना नागपूर येथे जावे लागते. ही स्थिती लक्षात घेता बुटीबोरीला तहसील दर्जा मिळावा आणि ॲडिशनल तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सुट्टीच्या दिवशी होणारा त्रास

बुटीबोरीमध्ये अनेक सरकारी कार्यालये असली, तरी तहसील कार्यालय नसल्याने सुट्टीच्या दिवशी नागरिकांना त्यांच्या प्रशासकीय कामांसाठी मोठी गैरसोय होत आहे. औद्योगिक शहर असल्याने येथे अनेक कामगार व व्यावसायिक वास्तव्यास आहेत. सुट्टीच्या दिवशी तहसील कार्यालये कार्यरत नसल्याने त्यांना त्यांच्या गरजेच्या कागदपत्रांसाठी प्रतीक्षा करावी लागते.

नागरिक आणि स्थानिक नेत्यांची मागणी

गौरव सिंह हजारी
गौरव सिंह हजारी

बुटीबोरी हे नागपूरच्या समीप असलेले महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे येथे तहसील दर्जा मिळाल्यास नागरिकांचे मोठे हित साधले जाईल. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *